त्याअनुषंगाने जिल्हयामध्ये जिल्हा बाल संरक्षण कक्ष बाल विवाह रोखण्यासाठी जबाबदारी पार पाडीत आहे. यासोबतच बाल विवाहाच्या माहिती खातरजमा करुन पोलिस यंत्रणा आणि बाल कल्याण समिती यांच्या सोबत समन्वयाने काम करीत असुन पुढील कार्यवाही करीत आहे. तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्ष आवश्यकतेनुसार पोलिसांना गुन्हा नोंदविण्यात सहकार्य करीत आहे. बाल विवाह रोखण्याकरीता गाव पातळीवर गाव बाल संरक्षण समितीची स्थापना करुन यासमिती मार्फत बाल विवाह रोखण्यास समन्वय करीत आहे. बाल कल्याण समितीच्या आदेशान्वये बालविवाहातील पाठपुराव्यासंदर्भात बाल कल्याण समितीला नियमित अहवाल सादर करीत आहे. बाल विवाह प्रतिबंधक 2006 ची अंमलबजावणी करतांना पोलिस विभाग, पंचायत विभाग, चाईल्ड लाईन, स्वयंसेवी संस्था, गाव बाल संरक्षण समिती यांची मदत घेतल्या जात असते.
तसेच बाल विवाह होत असल्यास बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 नुसार बाल विवाह थांबविण्याकरीता त्या विवाहाची संपुर्ण जबाबदारी खालील अधिकारी व पदाधिकारी यांची असते.